Powered By Blogger

सोमवार, १३ जुलै, २०२६

कन्याशाळा मलकापूर येथे रिलायन्स (Jio-bp) वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थिनींचा दिमाखदार गुणगौरव सोहळा!​

कन्याशाळा मलकापूर येथे रिलायन्स (Jio-bp) वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थिनींचा दिमाखदार गुणगौरव सोहळा!
​मलकापूर:
येथील रिलायन्स Jio मोबिलिटी लि. (Jio-bp) मलकापूर-कराड आणि श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे कन्याशाळा मलकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रिलायन्स (Jio-bp) च्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून एक भव्य गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. शुक्रवार, दिनांक १० जुलै २०२६ रोजी कन्याशाळा मलकापूर येथे हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यात शिक्षण, कला आणि क्रीडा अशा विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करून शाळेचे नाव उंचावणाऱ्या गुणवंत विद्यार्थिनींचा विशेष सन्मान करण्यात आला.
​ या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रिलायन्स बीपी चे एरिया सेल्स मॅनेजर मा. श्री. परिमल दरबार साहेब लाभले होते. त्यांच्या शुभहस्ते आणि कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुलोचना भिसे यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थिनींना प्रशस्तीपत्र,नोटबुक व पेन , आकर्षक कॅप, की-चेन आणि चॉकलेट देऊन गौरविण्यात आले. बक्षिसे मिळताच विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित झाला होता.
        ​याप्रसंगी रिलायन्स जिओ बीपी चे ऑपरेटर मा. संदीप जाधव, तसेच मा. राजेंद्र खबाले, मा. सोमनाथ माळी, मा. महेश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच शाळेच्या पर्यवेक्षिका सौ. करुणा शिर्के यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
        यावेळी मार्गदर्शन करताना एरिया सेल्स मॅनेजर मा. श्री. परिमल दरबार यांनी रिलायन्स कंपनी आणि तिच्या कामकाजाची माहिती दिली. तसेच, विद्यार्थिनींशी संवाद साधताना त्यांनी स्वतःचे अनुभव शेअर केले आणि "प्रत्येक विद्यार्थिनीने आयुष्यात आपले ध्येय निश्चित करावे व ते गाठण्यासाठी जिद्दीने वाटचाल करावी," असे प्रेरणादायी आवाहन केले.
          शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुलोचना भिसे यांनी आपल्या भाषणात शाळेत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती पाहुण्यांना दिली. त्या अभिमानाने म्हणाल्या, "आज कन्याशाळेच्या विद्यार्थिनी कोणत्याही क्षेत्रात मागे राहिलेल्या नाहीत. शिक्षण असो, कला असो की क्रीडा, प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपल्या कौशल्याचा ठसा उमटवला असून शाळेच्या यशाचा आलेख सातत्याने उंचावतच आहे."
           ​रिलायन्स Jio-bp कंपनीने दाखवलेल्या या सामाजिक दातृत्वाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. मागील वर्षीही याच कंपनीने सामाजिक बांधिलकी जपत कन्याशाळेतील विद्यार्थिनींना शूज आणि इतर शालोपयोगी साहित्याचे वाटप केले होते, अशी कृतज्ञतापूर्वक आठवण यावेळी काढण्यात आली. रिलायन्स कंपनीच्या या निरंतर मदतीबद्दल श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे सचिव व 'शेतीमित्र' अशोकराव थोरात (भाऊ), संस्थेचे सर्व संचालक मंडळ, पालक आणि विद्यार्थिनींनी कंपनीचे मनःपूर्वक आभार मानले. "ही मदत विद्यार्थिनींच्या शैक्षणिक वाटचालीमध्ये नक्कीच मोलाचा हातभार लावेल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
​        ​कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी रिलायन्स Jio bp चे सर्व कर्मचारी, तसेच श्री.अमृत शिर्के, श्री.शुभम चव्हाण सर्व शिक्षक, शिक्षिका यांनी विशेष परिश्रम घेतले.अतिशय नियोजनबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाने विद्यार्थिनींना भविष्यात अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी मोठी ऊर्जा दिली आहे.
       

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

स्पर्धा परीक्षेवर लक्ष केंद्रित करून सर्वोत्तम पदावर पोहचण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करा-मा.बी.एन. गायकवाड

स्पर्धा परीक्षेवर लक्ष केंद्रित करून सर्वोत्तम पदावर  पोहचण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करा-मा.बी.एन. गायकवाड      ...