Powered By Blogger

गुरुवार, २३ जुलै, २०२६

विद्यार्थिनींना मिळालेले पारितोषिक हे त्यांच्या अपार कष्टाचेच फळ आहे-मा.सौ. सुवर्णा जाधव (B.D.O. GTC, कोल्हापूर)


विद्यार्थिनींना मिळालेले पारितोषिक हे त्यांच्या अपार कष्टाचेच फळ आहे-मा.सौ. सुवर्णा जाधव 
   
    ​​मलकापूर (प्रतिनिधी):
 श्री मळाईदेवी शिक्षण संस्था संचलित, प्रे. च. कन्याशाळा, मलकापूर (ता. कराड) येथे एस.एस.सी. मार्च २०२६ परीक्षेतील प्रथम पाच क्रमांक प्राप्त विद्यार्थिनी, एन.एम.एम.एस. (NMMS) शिष्यवृत्तीधारक व महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्तीधारक विद्यार्थिनी तसेच त्यांच्या पालकांचा विशेष सत्कार समारंभ नुकताच प्रीतीसंगम मंगल कार्यालय, मलकापूर येथे मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला होता.यावेळी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून त्यांनी हे मत व्यक्त केले.
    ​ यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. बी. एम. गायकवाड (सेवानिवृत्त नायब तहसीलदार) आणि मा. कु. प्राजक्ता पाटील (पीएच.डी. सूक्ष्मजीवशास्त्र) व शेतीमित्र अशोकराव थोरात भाऊ यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
          यावेळी बोलताना मा.सौ. सुवर्णा जाधव (B.D.O. GTC, कोल्हापूर) म्हणाल्या, ध्येयाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी अंतर्मनात अभ्यासाची पेटती ज्योत आणि बुद्धीत सतर्कतेची धार असणे आवश्यक आहे. बाह्य जगाचे ज्ञान हे आपले मार्गदर्शक असावे, पण आपले मुख्य दैवत मात्र 'अभ्यास' आणि 'ध्येयपूर्ती' हेच असायला हवे! आज सर्व विद्यार्थ्यांना मिळालेले पारितोषिक हे त्यांच्या अपार कष्टाचेच फळ आहे असे मत आपल्या मनोगतात व्यक्त केले.
       प्रास्ताविकपर भाषणात शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुलोचना भिसे यांनी विविध उपक्रमांची उपस्थितांना करून देत ज्यांच्यामुळे या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थिनीच्या यशाचा आनंद द्विगुणित झाला त्या सर्व दातृत्व असणाऱ्या विविध मान्यवरांच्याबद्दल आपल्या भाषणातून कृतज्ञता व्यक्त केली.
        ​ कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी नायब तहसीलदार बी.एम.गायकवाड यांनी सर्व विद्यार्थिनींना शालेय जीवनात मिळालेल्या यशावर समाधानी न होता येणाऱ्या स्पर्धा परीक्षेवर लक्ष केंद्रित करून सर्वोत्तम पदावर पोहचण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करा असा कानमंत्र दिला.
          प्रमुख पाहुण्या कु. प्राजक्ता पाटील यांनी विद्यार्थिनींनी मिळविलेल्या यशासाठी त्यांचे अभिनंदन करीत विद्यार्थिनींनी आपल्या अभ्यासामध्ये सातत्य ठेवून येणाऱ्या काळात प्रयत्न केल्यास उद्याचा भविष्य नक्कीच आपण घडवणार आहोत असा आशावाद व्यक्त केला.
          शेतीमित्र अशोकराव थोरात भाऊ,म्हणाले,भविष्यातील यशाच्या इमारतीचा मजबूत पाया घालणारे सुवर्णपर्व म्हणजे विद्यार्थी जीवन. आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घडामोडींचे भान असणे, जगाच्या नकाशावर काय चालले आहे याचे ज्ञान असणे ही काळाची गरज नक्कीच आहे. परंतु, या बाह्य जगातील मोहाचे क्षणिक क्षितिज आणि शिक्षण क्षेत्रातील अनपेक्षित आव्हाने आपल्या ध्येयाचा मार्ग कधीही धूसर करू शकणार नाहीत, याची खरी खबरदारी विद्यार्थ्यांना घ्यावी लागेल.​बाह्य जगातील प्रलोभने ही एखाद्या वादळासारखी असतात, जी विचारांची दिशा भरकटवू शकतात. तेव्हा "वादळातही ज्याचा दीपस्तंभ अढळ असतो, तोच जहाजाला किनाऱ्यावर पोहोचवतो. तसेच, बाह्य वातावरणाचा आपल्या मनःशांतीवर आणि ध्येयावर कसलाही परिणाम होऊ न देता, विद्यार्थ्यांनी आपले संपूर्ण लक्ष केवळ आणि केवळ अभ्यासाच्या तपश्चर्येवरच केंद्रित केले पाहिजे."असा कानमंत्र त्यांनी दिला.
          तसेच कु. धनश्री संकपाळ, कु. स्वरा पाटील, कु. अर्पिता सूर्यवंशी या इयत्ता १०वी उत्तीर्ण विद्यार्थिनी व नीट परीक्षा उत्तीर्ण कु. श्रद्धा पाटोळे या विद्यार्थिनींनी भाषणातून शाळा माऊली विषयी कृतज्ञता व्यक्त केली.
     यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. भास्करराव पाटील, उपाध्यक्ष मा. श्री. वसंतराव चंद्रु चव्हाण व खजिनदार मा. तुळशीराम शिर्के,संचालिका मा. डॉ. सौ. स्वाती थोरात यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी, माजी प्राचार्य श्री. सुरेश राजे, मा.भास्करराव मोहिते, मा. संजय तडाखे,मा. सुधाकर शिंदे,माजी विद्यार्थिनी मेकॅनिकल इंजिनिअर कु. इरावती पाटील व पालकवर्ग मोठया संख्येने उपस्थीत होते.
      ​कार्यक्रमात प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थिनींचा व त्यांच्या पालकांचा गौरव करण्यात आला. विद्यार्थिनींच्या या उज्ज्वल यशाबद्दल रोख रक्कम स्वरूपात बक्षीस देत त्यांचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.कविता थोरात व सौ. देवकी थोरात यांनी केले तर पर्यवेक्षिका सौ.करुणा शिर्के यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
       ​कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका सौ.सुलोचना भिसे, शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनींनी विशेष परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

स्पर्धा परीक्षेवर लक्ष केंद्रित करून सर्वोत्तम पदावर पोहचण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करा-मा.बी.एन. गायकवाड

स्पर्धा परीक्षेवर लक्ष केंद्रित करून सर्वोत्तम पदावर  पोहचण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करा-मा.बी.एन. गायकवाड      ...